निवडणूक माहितीः१ उमेदवारी अर्ज भरण्याबाबत प्राथमिक माहितीः-

 उमेदवार किंवा सूचकाने सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणुक निर्णय अधिकारी अथवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करावा. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या दालन येथे देण्यात यावा. एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार उमेदवारी अर्ज दाखल करता येतात. एक उमेदवार जास्तीत जास्त दोन मतदार संघातही अर्ज दाखल करु शकतात.  नामनिर्देशन पत्र भरताना  जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटर च्या आत जास्तीत जास्त तीन वाहने उमेदवाराला आणता येतात. अर्ज दाखल करते वेळी केवळ ५ व्यक्ति उपस्थित राहू शकतात. उमेदवारी अर्जासोबत उमेदवाराचा फोटो २×२.५ सेमी आकाराचा देण्यात यावा. ऑनलाईन डेटा एन्ट्रीची सुविधा उपलब्ध आहे. अर्ज दाखल करण्याची सुविधा  ही ‘सुविधा’ या पोर्टल वर उपलब्ध आहे. त्यावर महिती आणि शपथपत्र अपलोड करता येऊ शकते. शपथ पत्र पूर्ण भलेले असावे.अपूर्ण असेल तर अर्ज रद्द होवू शकतो. नमुना c 1 ची वर्तमान पत्रातून प्रसिध्दी करावी लागते.मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी अर्ज ‘अ’ आणि ‘ब’  . भरणे आवश्यक  आहे. सर्वसाधरण प्रवर्गासाठी २५हजार रुपये,  व राखीव  प्रवर्गासाठी १२ हजार ५०० रुपये अनामत रक्कम भरणे आवश्यक. तीन फोटो. स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे. मान्यता नसलेल्या पक्षाच्या व अपक्ष  उमेदवार यांना १० सूचक आवश्यक आहे.  आणि हे सूचक त्याच मतदासंघांतील  रहिवासी असावेत.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा