संविधान अमृत महोत्सवी वर्षात ‘घर घर संविधान’ अभियान; अधिकारांसोबत कर्तव्यांबाबतही जागरुक रहावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर,दि.२६(जिमाका)- भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सन २०२४-२५ या वर्षात ‘ घर घर संविधान’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. आज यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान उद्देशिकेचे सामुहीक वाचन करण्यात आले. प्रत्येक भारतीयाने संविधानाबाबत आदर बाळगावा व संविधानाने आपल्याला दिलेल्या अधिकारांसोबत कर्तव्यांबाबत जागरुक राहून कर्तव्य पालनही करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात हा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, डॉ. सुचिता शिंदे, डॉ. व्यंकट राठोड, एकनाथ बंगाळे आदी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखाप्रमुख व अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, भारतीय राज्यघटना ही अथक परिश्रम आणि सखोल अभ्यासाअंती तयार करण्यात आलेला एक दस्तऐवज आहे. या संविधानाद्वारे आप...