Posts

Showing posts from May, 2024

टॅंकरमुक्तीसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘जलसमृद्ध गाव अभियान’ ; जलपुनर्भरणाच्या उपाययोजना राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
    छत्रपती संभाजीनगर,दि.३१(जिमाका):- जिल्हा टॅंकरमुक्त करण्यासाठी ‘जलसमृद्ध गाव’ हे अभियान दि.५ जून पासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. यंदा   टंचाईत ज्या गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला अशा गावांमध्ये विहीर, बोअरवेल जल पुनर्भरण तसेच छतावर पडणारे पावसाचे पाणी अडवून संरक्षित करणे ह्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.पर्यावरण दिन ५ जून पासून ह्या अभियानाला सुरुवात करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.             जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात बैठक घेण्यात आली. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रदीप झोड, सहा. आयुक्त पशुसंवर्धन डॉ. रमण इंगळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे, वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी, उप कार्यकारी अभियंता एम.एम. ख...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
    छत्रपती संभाजीनगर, दि.३१(जिमाका):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) एकनाथ   बंगाळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. नायब तहसिलदार बारवाल तसेच    जिल्हाधिकारी   कार्यालयातील अन्य अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

दारुबंदी व परिवहन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा -जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आदेश

         छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका):- जिल्ह्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ व मोटार परिवहन कायदा १९८८ मधील तरतूदींची प्रभावी अंमलबजावणी करुन नियमभंग करणारे मद्यविक्री अनुज्ञप्तीधारक, वाहन चालक, व्यक्ति यांच्याविरुद्ध कडक कारवाई करा,असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्गमित केले आहेत.             आदेशात म्हटले आहे की, जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांना   महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ मधील तरतुदींच्या अधिन राहून व्यवहार करणे बंधनकारक आहे.अशा तरतूदींचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी. त्यात अनुज्ञप्तीधारकांच्या दुकाने- आस्थापना उघडणे व बंद करण्याच्या वेळेचे पालन करण्याबाबत, तसेच परवानाधारक व्यक्तिसच मद्य वितरण करणे, किमान २५ वर्षे वय असलेल्या व्यक्तिस मद्य व २१ वर्षे वय असलेल्या व्यक्तिस सौम्य बियर, सौम्य मद्य वितरण करणे तसेच विना परवाना मद्य बाळगणे व सेवन करणे, अशा व्यक्तिस मद्य वितरण करणे असे नियमबाह्य कृत्य करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांना व व्यक्तिंव...

विभागीय आढावा बैठकीत मान्यवरांचे मार्गदर्शन :बांबू लागवड पर्यावरण व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर

Image
         छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका):- बांबू लागवड ही पर्यावरण व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक लाभ होईलच शिवाय पर्यावरणाचे रक्षण होईल,असे मार्गदर्शन आज विभागीय आढावा बैठकीत मान्यवरांनी केले.             महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू व फळबाग लागवड कार्यक्रमाची विभागीय आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीस पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, मनरेगाचे महासंचालक नंदकुमार, मनरेगा आयुक्त अजय गुल्हाणे, विभागीय आयुक्त मधुकर आर्दड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,वातावरणीय बदल कृती कक्षाचे संचालक अभिजीत घोरपडे, कोन्बॅक संस्थेचे संचालक संजीव करपे तसेच दुरदृष्य प्रणालीद्वारे विभागातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विभाग, वन विभाग, सामाजिक वनिकरण, महसूल, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा अशा विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.        ...

बाल धोरण मसूदाःसुधारणा, हरकती, सुचना मागविल्या

         छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका):- महिला व बालविकास विभागातर्फे बालधोरणाचा प्रारुप मसूदा तयार करण्यात आला आहे. तज्ज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने हा मसूदा तयार केला आहे.   महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२ असा हा मसूदा तयार आहे. हा मसूदा शासनाच्या   https://womenchlid.maharashtra.gov.in व   https://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.   प्रस्तावित बालधोरण हे   इंग्रजी व मराठी भाषेत   उपलब्ध असून   त्यात आवश्यक बाबी, सुचना, सुधारणा, हरकती तसेच शब्दरचना, व्याकरण इ. संदर्भाने हरकती व सुचना नागरिकांकडून मागविण्यात आल्या आहेत. या सुचना नागरिकांनी दि.३० जून रोजी सायं. सव्वा सहा वा. पर्यंत   महिला व बालविकास आयुक्तालय, २८ राणीचा बाग, जुन्या सर्किट हाऊस जवळ, पुणे   यापत्त्यावर अथवा childpolicy@gmail.com   या इ-मेल पत्त्यावर पाठविण्यात यावा असे महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे. ०००००

१९- औरंगाबाद लोकसभा मतदार संघःसज्जता मतमोजणीची

Image
         छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मंगळवार दि.४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.१९- औरंगाबाद लोकसभा मतदार संघाची मतमोजणी एमआयटी महाविद्यालय, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर   येथे सकाळी ८ वाजेपासून होणार आहे. या मतमोजणीसाठी निवडणूक विभागाने सज्जता केली आहे, अशी माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.             मतमोजणीसाठी निवडणूक शाखेने सर्व सज्जता केली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. बुधवारी (दि.२९) त्यांनी सर्व सहा. निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी, नोडल अधिकाऱ्यांनी सर्व व्यवस्थेची पाहणी केली.   मतमोजणी कर्मचाऱ्यांचे यादृच्छिकीकरण   मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे पहिले यादृच्छिकीकरण   दि.२७ मे रोजी झाले आहे. सोमवार दि.३ जून रोजी निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत दुसरे विधानसभा मतदारसंघनिहाय यादृच्छिकीकरण होईल. त्यानंतर मंगळवार दि.४ रोजी प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी तिसरे टेबलनिहाय या...

बार,दारु दुकानांची संयुक्त तपासणी करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
         छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका):- अल्पवयीन मुलांचे मद्यप्राशन तसेच मद्य पिऊन वाहन चालविणे व त्यातून होणारे अपघात रोखण्यासाठी   जिल्हा प्रशासनाद्वारे कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी संयुक्त पथके स्थापन करुन परमिट रुम, बियरबार, मद्यविक्री दुकाने, वाहने इ.ची तपासणी करावी, यासोबतच पालक व मुलांचे प्रबोधन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.             अल्पवयीन मुलांमध्ये मद्यप्राशन व अन्य व्यसनाधिनता त्यातून होणारे गुन्हे, अपघात इ. प्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबविण्याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक पार पडली. पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनिल भोकरे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क संतोष झगडे, पोलीस उपायुक्त वाहतुक शिलवंत नांदेडकर, पोलीस उपायुक्त एस.एन. भुजंग, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी एम.व्ही. दौंड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दयानंद मोतीपवळे, ...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
         छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):- जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

मतमोजणी प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
               छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):- मतमोजणीसाठी नियुक्त सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निर्दोष पद्धतीने पार पाडता यावी यासाठी प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध करावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी   दिलीप स्वामी यांनी केले.              १९ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया मंगळवार दि.४ जून रोजी होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी   यांचे प्रशिक्षण आज वंदे मातरम सभागृहात आयोजित करण्यात आले होते.   प्रशिक्षणास पोलीस आयुक्त मनोज लोहिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, व्यंकट राठोड, एकनाथ बंगाळे उपस्थित होते.             पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी कायदा सुव्यवस्थेविषयी सगळ्यांना माहिती दिली. त्यात प्रवेश, पार्किंग व्यवस्था,सुरक...

विशेष लेखः- उष्माघातः कारणे;लक्षणे व उपचार

Image
शारीरिक श्रमाची , अंग मेहनतीचे व कष्टाची कामे करणे , जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे , घट्ट कपड्याचा वापर करणे , प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होऊ शकतो. उष्माघाताची लक्षणे उष्माघात झाल्यावर मळमळ , उलटी , हात पायांना गोळे येणे , थकवा येणे , ४० डिग्री सेल्सीअसपेक्षा जास्त ताप येणे , त्वचा गरम होणे व कोरडी पडणे , घाम न येणे , डिहायड्रेशन , चक्कर येणे , निरुत्साही वाटणे , डोके दुखणे , छातीत धडधड होणे , बेशुद्ध अवस्था आदी  लक्षणे दिसून येतात. उष्माघाताची जोखिम कोणास अधिक नवजात बालके , लहान मुले , आधीच आजारी असलेल्या व्यक्ति, सतत उन्हात व मेहनतीचे काम करणाऱ्या व्यक्ती , वयस्कर, वयोवृद्ध व्यक्ती ह्या व्यक्तिंना उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते.   असा करा प्रथमोपचार उष्माघाताच्या रुग्णास प्रथम सावलीत आणावे . रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी त्वरित उपचार सुरू करावेत. कपडे सैल करून त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे. हवेशीर व थंड खोलीत ठेवावे. खोलीतील पंखे , कुलर्स , एसी त्वरित चालू क...

मासिक पाळी स्वच्छ दिनाचे महत्त्व

Image
जागतिक मासिक पाळी दिन दरवर्षी २८  मे रोजी साजरा केला जातो महिला व मुलींना मासिक पाळीचे व स्वच्छतेचे महत्त्व सांगून आरोग्य शिक्षण देऊन आजारांपासून प्रतिबंध व आरोग्याचे समर्थन करणे , संवर्धन करणे , जनजागृती करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे   आपल्याकडे ५० टक्के पेक्षा अधिक मुली व महिलांना  मासिक पाळीच्या आरोग्याच्या समस्या भेडसावतात .  याबाबत अधिक माहिती करुन देणारा हा लेख- स्त्री (मुलगी) वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो , त्याला   मासिक पाळी   (Menstrual cycle/ एमसी) असे म्हणतात.   मासिक पाळी किती दिवसांनी येते ? महिलांना दर महिन्याला मासिक पाळी येते. सामान्यतः मासिक पाळी २८ दिवसांची असते. याचा अर्थ कालावधीच्या पहिल्या दिवसापासून पुढील कालावधीच्या पहिल्या दिवसापर्यंत अंदाजे २८ दिवस. २८ दिवस ही सरासरी संख्या आहे , परंतु ती २१ ते ३५ दिवसांच्या दरम्यान असणे देखील सामान्य आहे. मुलीला एक किंवा दोन वर्षे अनियमित मासिक पाळी येणे सामान्य आहे. सन २०२४ चे मासिक पाळी स्वच्छता यावर्षीचे जागतिक घोष वाक्य:  " Together for a Period Fri...