जिल्हाधिकारी कार्यालयात ‘हरघर तिरंगा’; स्वातंत्र्यासाठी त्याग, बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण हे आद्यकर्तव्य- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर दि.१४(जिमाका)- तिरंगा ध्वज हा आपल्या स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. ह्या स्वातंत्र्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपले प्राणाचे बलिदान दिले,घरादारावर तुळशीपत्र ठेवले. त्यांचे स्मरण करणे आपले आद्यकर्तव्य असून त्यासाठीच 'हर घर तिरंगा' हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यात सहभागी होणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.
हर घर
तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात आज सर्व
अधिकारी कर्मचाऱ्यांना तिरंगा ध्वज वितरीत करण्यात आला. त्यानंतर आयोजित
कार्यक्रमात जिल्हाधिकारी स्वामी बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर,
उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, डॉ. सुचता शिंदे,
जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ आदी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व
कर्मचारी उपस्थित होते.
आज
सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सर्व अधिकारी कर्मचारी यांना राष्ट्रध्वज
वितरण करण्यात आले. भारतमाता की जय, वंदे मातरम, हर घर तिरंगा अशा घोषणा देण्यात
आल्या. त्यानंतर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी स्वामी यांनी नियोजन
सभागृहात संबोधित केले.
जिल्हाधिकारी
स्वामी म्हणाले की, आपण आज उपभोगत असलेले स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही.
लाखो लोकांनी त्यासाठी बलिदान दिले आहे. त्यांच्या त्याग आणि बलिदानामुळे आपण आज
हे स्वातंत्र्य उपभोगत आहोत. त्यामुळे या त्याग बलिदानाची आठवण ठेवणे व ती पुढच्या
पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येकाने देश हा सर्वतोपरी मानून
देशाप्रति आपले कर्तव्य बजावण्यास प्राधान्य द्यायला हवे,असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक प्रभोदय मुळे यांनी केले.
०००००
Comments
Post a Comment