शिधापत्रिकाधारकांचे आधार प्रमाणिकरण,ई- केवायसी अनिवार्य जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन;२८ फेब्रुवारी पर्यंत मुदत

 छत्रपती संभाजीनगर,दि.११(जिमाका)-सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार सर्व शिधापत्रिकाधारकांनी आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी केले आहे.

            आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी करण्यासाठी गावोगावी शिबिरे आयोजीत केले जात आहेत. शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून, अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करावयाचे आहे. ही प्रक्रिया दि.२८ फेब्रुवारी पर्यंत करावयाची आहे. ई-केवायसी केले नाही तर त्यानंतर धान्य वितरण  बंद होऊ शकते, याची नोंद घ्यावी. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा. सर्व लाभार्थी व रास्तभाव धान्य दुकानदार यांनी दि.२८ पर्यंत आपले ई- केवायसी पुर्ण करावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा