प्रलंबित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विशेष उपक्रम; दर महिन्याच्या २ तारखेला तक्रार निवारण दिवस

 छत्रपती संभाजीनगर, दि.१०(जिमाका)- प्रलंबित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासन तक्रार/ प्रलंबितता निवारण दिवस राबविणार आहे. त्याची सुरुवात याच महिन्यात दि.१८ पासून उपविभागीय स्तरावर तर जिल्हास्तरावर दि.२० रोजी होणार आहे. तर जुलै महिन्यापासून दर महिन्याच्या १ तारखेला उपविभागीयस्तरावर तर २ तारखेला जिल्हास्तरावर तक्रार निवारण दिवस आयोजीत करण्यात येणार आहे.

        जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यासंदर्भात आज निर्देश दिले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात नागरिकांना त्यांच्या तक्रारी व गाऱ्हाण्यांचे निवारण करता यावे यासाठी प्रत्येक महसूल कार्यालयात तक्रार पेटी व QR कोड द्वारे ऑनलाईन तक्रार प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, कोणतेही प्रकरण १० जून २०२५ पर्यंत प्रलंबित राहू नये, यासाठी ‘झिरो पेंन्डंसी’चे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत.तरीही ज्या नागरिकांच्या तक्रारी/ प्रलंबित प्रकरणे असतील अशा नागरिकांनी थेट संपर्क साधावा, त्यांच्या समस्या ऐकून घेता याव्यात, यासाठी महसूल विभागाने ‘तक्रार / प्रलंबितता निवारण दिवस’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या उपक्रमाअंतर्गतः-

बुधवार दि.१८ रोजी उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयात 'तक्रार निवारण होईल. त्यानंतर शुक्रवार दि.२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘तक्रार निवारण’ होईल. तसेच जुलै महिन्यापासून दर महिन्याच्या १ तारखेला (सुट्टी असल्यास दुसऱ्या दिवशी) उपविभागीय व तहसील कार्यालयात आणि २ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात हा दिवस राबविण्यात येईल.

यासंदर्भातील माहिती  ग्रामपंचायतीत प्रसिद्ध करण्यात येईल. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत प्रमुख अधिकारी व संबंधित शाखांचे कर्मचारी उपस्थित राहतील. आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या नाव, पत्ता व तक्रारीची नोंद घेऊन त्वरित उपाययोजना केली जाणार आहे. तक्रार पेटीतील अर्जही याच दिवशी उघडून कार्यवाही केली जाईल,असे स्पष्ट करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा