ग्रामीण भागात मनाई आदेश
छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका)- आगामी कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी हे आदेश निर्गमित केले असून दि. ३१ मार्च ते १३ एप्रिल दरम्यान हे आदेश अंमलात राहतील,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment