'पराक्रम दिना'निमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन 1 ते 15 ऑगस्टदरम्यान प्रवेशिका स्वीकारल्या जाणार; विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि. 31 (जिमाका ) - महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 18 ऑगस्ट हा दिवस राज्यभर 'पराक्रम दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त 1 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन 'अमृत' संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिष्ठेची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्पर्धांमध्ये शालेय, महाविद्यालयीन आणि खुला गट अशा विविध स्तरांवर निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. रिल्स स्पर्धा महाविद्यालयीन व खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली आहे. निंबंध स्पर्धा निबंधाची शब्दमर्यादा जास्तीत जास्त 1000 शब्द असून मराठी, हिंद...